Ad will apear here
Next
रिक्षाचालक प्रकाश माने बनले वृक्षलागवडीचे प्रेरणादूत

मुंबई : उपजीविकेसाठी प्रत्येक जणच वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय-नोकरी करतो; मात्र उपजीविकेच्या साधनाला सामाजिक जाणिवेची जोड देणारे फारच कमी असतात. दहिसर येथील रिक्षाचालक प्रकाश माने हे त्यातलेच एक आहेत. त्यांनी आपल्या रिक्षाला वेगवेगळी १० रोपे लावून अनोख्या पद्धतीने सजविले असून, या माध्यमातून ते वृक्ष लागवडीचा संदेशही देत आहेत. त्यामुळे ते वृक्षलागवडीचे प्रेरणादूत ठरले आहेत. 

आपल्या या आगळ्यावेगळ्या रिक्षाबद्दल सांगताना माने म्हणाले, ‘वेगवेगळ्या रोपांनी सजवलेली माझी रिक्षा जेव्हा रस्त्यावरून धावते तेव्हा ती लोकांना खूपच आवडते. रिक्षात बसणारे लोक म्हणतात, आम्हाला रिक्षात नाही तर उद्यानात बसल्यासारखे वाटते. मनाला खूप प्रसन्नता आणि आनंद मिळतो. लोकांच्या या प्रतिक्रिया मला खूप प्रोत्साहित करतात. आपल्या सगळ्यांनाच झाडांची आणि निसर्गाची खूप ओढ असते. दररोजच्या धकाधकीच्या प्रवासात लोक माझ्या रिक्षात कधी पंधरा मिनिटे, कधी अर्धा तास, तर कधी एक तास बसतात. मग मी त्यांना कुठल्या प्रकारे आनंद देऊ शकतो याचा मी विचार केला आणि मग प्लास्टिकचे फुले, रंगीबेरंगी पताका लावण्यापेक्षा ती अधिक सजीवपणे उठून दिसण्यासाठी माझ्या रिक्षाला वेगवेगळ्या ठिकाणी मध्यम आणि लहान उंचीची १० रोपे बांधून घेतली. यात पांढरे तगर आहे, जास्वंद आहे, तुळस आहे, मनीप्लांट आहे, कढीपत्त्याचे रोप आहे आणि इतरही रोपे आहेत.’

‘माझ्या घरात आईसह माझी पत्नी आणि तीन मुले असून, त्यांना सगळ्यांना झाडे लावण्याची खूप आवड आहे. आम्ही केतकीपाडा, दहिसर येथील आदिवासी पाड्यात राहातो. निसर्गाच्या सान्निध्यात राहात असल्याने झाडांची आवड होतीच. त्यातून ही कल्पना सुचली. लोकांना माझी रिक्षा खूप वेगळी वाटते. सिग्नलला थांबलो, तर लोक रिक्षाजवळ येऊन ‘सेल्फी’ काढतात, गाडीत बसलेले लोक गाडीतून हाताने ‘खूप सुंदर’ असे सांगतात. एवढेच कशाला, रिक्षात बसणारे लोक रोपांसाठी पैसे देतात. म्हणतात - आमच्या नावाने रिक्षात एक रोप लावा. एका प्रवाशाने ५० रुपये काढून दिले आणि म्हणाला, आणखी एखादे चांगले रोप विकत घ्या आणि रिक्षाला लावा. अशी ही माझी रिक्षा वेगळी असून, ती वृक्षलागवडीचा, पर्यावरण रक्षणाचा संदेश देते. तिला पाहून लोकांना आनंद होतो आणि त्यांच्या आनंदात मी आनंदी होतो.’

माने यांच्या या अनोख्या छंदाची दखल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली आहे. ते म्हणाले, ‘पोटापाण्यासाठी लोक विविध प्रकारचे उद्योग-व्यवसाय करतात; पण हे करत असताना सामाजिक भान जपून पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुढे येणारे, हरित महाराष्ट्रासाठी योगदान देणारे रिक्षाचालक प्रकाश माने यांच्यासारखे योद्धे हे खऱ्या अर्थाने पर्यावरण रक्षणाचे, वृक्षलागवडीच्या मोहिमेचे प्रेरणादूत ठरतात.’ 


‘वन विभागाने तीन वर्षांत ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला असून, आतापर्यंत १७ कोटी वृक्ष लागवडीच्या संकल्पांतर्गत राज्यात २१ कोटींहून अधिक लागवड झाली आहे. येत्या पावसाळ्यात आपल्या सर्वांना मिळून ३३ कोटी वृक्ष लागवड करावयाची आहे. राज्य दुष्काळाने त्रस्त असताना अधिकाधिक वृक्ष लावून पडणाऱ्या प्रत्येक पाण्याचा थेंब जमिनीत मुरवण्यासाठी आणि भूजलपातळी वाढवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची पराकाष्ठा होणे गरजेचे आहे. प्रकाश माने यांच्यासारखी माणसे या मोहिमेचा आधार असून, हरित महाराष्ट्राच्या निर्मितीचे ते खरे शिल्पकार आहेत असे मला वाटते,’ असे मुनगंटीवार म्हणाले. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZZECB
Similar Posts
पर्यावरण संवर्धनासाठी लोकप्रतिनिधींचा अनोखा निर्धार मुंबई : देशात नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर विजयी झालेल्या काही खासदारांनी पुढाकार घेत आपल्या मतदारसंघात ‘जेवढी मते तेवढी झाडे’ लावण्याचा अनोखा निर्धार जाहीर करत पर्यावरण रक्षणाप्रती आपली कटिबद्धता जाहीर केली. या सर्व खासदारांचे अभिनंदन करताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सर्व
‘त्याग, सेवा, मानवता भावाबरोबर ‘वृक्ष भाव’ वाढवा’ मुंबई : ‘सर्व धर्मांत वृक्ष पूजनीय असून, पर्यावरणात ‘नारायण’ आहे ही शिकवण प्रत्येक धर्मांतून मिळते. त्याग भाव, सेवा भाव, मानवता भाव यांबरोबर धार्मिक संस्थांच्या प्रतिनिधींनी समाजात ‘वृक्ष भाव’ रुजवावा,’ असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सात जून २०१९ रोजी केले.
वृक्ष लागवड चळवळ अंतिम टप्प्यात महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याबरोबरच हरित बनवण्याचा ध्यास घेत राज्यभरात १३ कोटी वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प सरकारच्या वतीने साधारण महिन्याभरापूर्वी करण्यात आला होता. त्यानुसार सुरू झालेली ही चळवळ आता लोकचळवळीत रूपांतरित झाली असून, या उपक्रमात आतापर्यंत तब्बल ११ कोटी ८८ लाख २९ हजार ७८ इतक्या वृक्षांची
स्वच्छ कांदळवन अभियानाची ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद मुंबई : राज्य सरकारच्या वन विभागातर्फे लोकसहभागातून राबविल्या जात असलेल्या स्वच्छ कांदळवन अभियानाची दखल ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ने घेतली आहे. २०१५मध्ये कांदळवन कक्षाने सुरू केलेल्या स्वच्छ कांदळवन अभियानामध्ये मुंबई आणि परिसरातील ११.०३ किलोमीटर समुद्र आणि खाडी किनारी क्षेत्रातील आठ हजार टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language